वृ.क्र : 217 दि:15 एप्रिल 2019
जिल्हयात 37(1)(3) कलम जारी
गडचिरोली,दि.15:- गडचिरोली
जिल्हयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 चे अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागु आहे. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन या पार्श्वभुमिवर
या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली
जिल्हयात 26 एप्रिल 2019 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम , 1951 चे कलम 37 (1) (3) लागु करण्यात
आलेले आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या
दृष्टीने विवक्षित कृतीना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध करण्यासंदर्भातील
निर्देश आहेत.
या कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी,
भाले, दंडे, बंदुका,
सुरे, काठया किंवा लाठया किंवा शारिरीक इजा
करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही
वस्तु बरोबर नेणे, कोणताही
दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर
क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने
बाळगणे, किंवा जमाकरणे, तयार करणे यावर
प्रतिबंध घालण्यात आले आहे. राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये
उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे किवा अशी चित्रे,
चिन्हे, फलक किंवा इतर कोणतेही जिनस किंवा
वस्तु तयार करणे किंवा प्रसार करणार नाहीत. पोलिस विभागाच्या पुर्व परवानगीशिवाय
कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक
जागेत, सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर 26 एप्रिल 2019 पर्यंत च्या 24 वाजेपर्यंत कोणीही जमा होणार नाहीत. हे कलम
गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागु राहतील असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, गडचिरोली
यांनी आदेशीत केले आहे.
*****